शुक्रवार, ३ जुलै, २०१५

शाळाबाह्य मुले

दिनांक: भारतीय सौर १३ आषाढ शके १९३७, (४ जुलै, २०१५)

मदरशात शिकणारी मुले ही शाळाबाह्य मुले ठरवली जाणार म्हणून महाराष्ट्रात खुप गदारोळ उठला आहे. काँग्रेससहित ओवेसी सारखे रथीमहारथी या भांडणात पडले आहेत. मदरशात काय काय शिकवले जाते त्या भानगडीत मी पडत नाही कारण तो अातंकवादी विषय आहे. माझ्या बोलण्याने आतंक माजू शकतो म्हणून मुख्य गोष्ट सांगतो.
मदरसा असो किंवा वेदविद्यालय किंवा आणखी कोणती शिक्षणसंस्था, त्यांनी सरकारने स्थापन केलेल्या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम अंगिकारलाच पाहिजे. सरकारची परवानगी घेतलीच पाहिजे. आणि सरकारने ठरवलेले अभ्यासक्रमच शिकवले पाहिजेत.

जर नसेल अशा अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षण द्यायचे तर......

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जसे बोगस ठरवले जात आहे तसे तुम्हालाही ठरवले जाणार हे लक्षात ठेवा....
पण मला काय त्याचे? कशाला मध्ये पडू? Sin, Cos, Tan, काय असते हे जरी मला, आता माहित नाही, तरीही ते मी रितसर शिकलेलो आहे.

म्हणून माझे शिक्षण सरकार मान्य आहे. माझी पदवी बोगस नाही. मी शाळाबाह्य नाही.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

(टिप: लोगरीदम की लोगरिथम समजत नाही म्हणून दहावीत मी प्रश्न क्रमांक ६ कडे ढुंकूनही पाहिले नाही. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा