बुधवार, २२ जुलै, २०१५

अजितदादांची गुगली

दिनांक: १८ जुलै, २०१५

परवा विधानसभेत अजित पवार म्हणाले, 'मोदींचा फोटो जर लावला नसता तर भाजपचे लोक कुठल्याकुठे उडून गेले असते.'

वा! दादा! वा! भाजपचे  आमदार, खासदार आणि प्रवक्ते यांना जागा दाखवली. एका दगडात दोन पक्षी मारलेत. मोदीकाका पण खुष अन  मोदी खुस तर सिंचन घोटाळा फुस.

भाजच्या लोकांची पार गोची करून टाकली. तुम्ही बोलले. त्यांनी ऐकले पण उत्तर काय देणार? दिले तरी अडचण नाही दिले तरीही….सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था.

हा म्हणजे 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे.'

शबाश अजितदादा! याला म्हणतात राजकारण! धरणात मुतत बसण्यापेक्षा हे चांगले आहे की दादा! लगे रहो!

नमोभक्तही आता अजितदादांचे विधान मान्य करतीलच. करावे लागेलच. पर्यायच नाही.

खरं की खोटं?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा