दिनांक: ८ जुलै, २०१५
कोणी वारल्यावर म्हणजे मृत्यू पावल्यावर हिंदीत बोलतात की, अमूक-तमूक 'भगवानको प्यारा हो गया!"
मला हे कळत नाही की, देवाला आवडणारे लोक जर देव स्वतःकडे बोलवून घेत असेलतर हे चूकीचे आहे. देवाने असे नको करायला.
त्यामुळे काय होते की लोक पापे करत बसतात कारण त्यांना जगायचे असते. पुण्य केले तर लगेच देवाला 'प्यारे झाले तर?"
म्हणून पापे करा! आयुष्य वाढवा! असे तर लोक समजत नसतील ना?
टीप: कोणी जास्त मनावर घेऊ नये, उलटेही असू शकते. काय भरवसा? उगीच माझं ऐकाल आणि फसाल. मी काही कोणी तत्वज्ञानी नाही हे सर्वांनाच माहीत आहे. हाहाहा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा