शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

बाजीराव-मस्तानी

दिनांक : २२ नोव्हेंबर, २०१५

संजय लिला भन्सालीच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमा विरोधात भरपूर गदारोळ चालू आहे. मला वाटते की ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत चित्रपट लेखक, निर्माता यांनी खूपच काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावणार नाही हे पहिले पाहिजे. परंतु आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे आणि कोणालाही काहीही लिहता येते, व्यक्त होता येते. म्हणून लेखक, चित्रपट निर्मातेही काहीही लिहतात, दाखवतात. त्याला आपण कायद्याने काहीच करू शकत नाही. फक्त लोकशाही मार्गाने धरणे धरू शकतो. निषेध मोर्चे काढू शकतो. बाकी काहीच करू शकत नाही. मागे अमीर खानचा पीके आला. भरपूर विरोध झाला त्याला. पण काय झाले. काहीच नाही. उलट अती प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपट भरपूर चालला. मागे जोधा अकबर हा चित्रपट आणि त्याच नावाची मालिका यांनाही भरपूर विरोध झाला. पण काय झाले? निर्मात्यांनी एक ओळ टाकली, 'हा चित्रपट ऐतिहासिक आहे,असा आम्ही दावा करत नाही.' बस! संपला विषय. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मालिकाही. नंतर सर्व चिडीचूप.

आता बाजीराव मस्तानी या चित्रपटाबद्दल सुद्धा असे होऊ शकते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याला अजूनही भरपूर वेळ आहे. १८ डिसेंबरला गोंधळ घालणार आहे तो. म्हणजे एक महिना आहे आणखी. तोपर्यंत तरी भंसाली काही करणार नाही. म्हणून तोपर्यंत 'पिंगा' या गाण्याला विरोध करणारे गोंधळ घालणार.  त्याच्या चित्रपटाला अशीच प्रसिद्धी मिळणार, फुकट. आणि शेवटी काय होणार? काहीही नाही. गाणे तसेच राहील आणि विरोधक सुद्धा गप्प बसतील.

कारण....

कारण चित्रपटात ज्या गाण्यात मस्तानी आणि काशीबाई यांना नाच करताना दाखवले आहे, त्या अगोदर फक्त श्रीमंत बाजीराव पेशवे असे स्वप्न पाहतील की मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाच करत आहेत. विषय संपला. बाजीरावांनी काय स्वप्ने पहिली असतील याची इतिहासात कुठेही नोंद नाही. याला इतिहासाचे विकृतीकरण म्हणता येणार नाही मग. कल्पनेची भरारी असेल ती. जशी '१५ लाख तो हरएकके खाते में ऐसेही जमा हो जायेंगे', तशी.

जाताजाता: चित्रपट खूप भव्यदिव्य आहे आणि सर्वांना तो आवडेल असे ट्रेलर वरून तरी जाणवत आहे. बेस्ट डायलॉग- बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है,  ऐयाशी नही.

https://youtu.be/eHOc-4D7MjY

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा