दिनांक: २६ सप्टेंबर, २०१५
*अहिंसेच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो-गांधीजी
* स्वातंत्र्यासाठी रक्त सांडल्याशिवाय लोकांना स्वातंत्र्याचे महत्व कळणार नाही.- लोकमान्य टिळक
*तुम मुझे खुन दो, मैं आझादी दुंगा- नेताजी सुभाषचंद्र बोस.
* दे दी आझादी तूने खड़ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल- स्वातंत्र्यानंतर लोकांच्या मनावर बिंबवले गेले.
बापूंच्या अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले आहे, असेच शिकवले गेले. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी रक्त सांडलेले आहे, हेच जर आपल्या लक्षात आणू दिले गेले नसेलतर स्वातंत्र्याचे महत्त्व लोकांना कळत नाही, असे म्हणणे म्हणजे दांभिकपणाचा कळस आहे. यात लोकांची काहीही चूक नाही, याचा दाखला लो. टिळक आणि सुभाषबाबूंचे विधानेच देतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा