दिनांक: १३ सप्टेंबर, २०१५
महाराष्ट्र टाइम्समध्ये मटा कौल म्हणून एक सदर असते. त्यात चालू घडामोडींबद्दल प्रश्न विचारून वाचकांचा कौल घेतला जातो. दोन दिवसांपूर्वी असाच एक प्रश्न विचारला होता.
'शाळा-काॅलेजात रामायण-गीता शिकवल्याने शैक्षणिक पात्रता वाढेल, असे वाटते काय?'
रामायण-गीता आणि शैक्षणिक पात्रता? काय संबंध? खरे पाहिले तर असा प्रश्न विचारून मटाला असे सिद्ध करायचे असावे की रामायण आणि गिता शिकवल्याने काही फरक पडणार नाही. शैक्षणिक पात्रता ही विज्ञान, व्यवस्थापन, कला यामुळे वाढेल हे कोणीही सांगेन.
परंतु मटाचे वाचक सुद्धा 'महा भयंकर' निघाले. जवळजवळ ५८ टक्के लोकांनी 'होय' असा कौल देऊन मटाला तोंडघशी पाडले.
प्रिय मटा संपादक,
तुम्ही डुलक्या काढता तशा वाचक काढतात असे कृपया समजू नका! आणि धर्माच्या नावाने दुही पेरू नका!
हाहाहा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा