दिनांक: २५ ऑगस्ट, २०१४
बोधनकर साहेब,
आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट, २०१४ च्या महाराष्ट्र टाइम्सच्या अंकातील 'सगुण-निर्गुण' सदरातील 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी !' हा आपला लेख वाचला.
या लेखातील 'नारळाचे झाड' हे निरपेक्ष प्रेमाचे प्रतिक वाटले. नेहमी प्रमाणेच एक सुंदर आणि नाविन्यपूर्ण लेख आपण लिहला आहे. प्राणी असे प्रेम करतात हे माहित होते आणि अनुभवलेही होते परंतू एका वृक्षाकडून अशी भावना व्यक्त केली जावू शकते हे कधीच मनाला शिवले नाही. धन्य ते आपले वडील आणि धन्य ते 'नारळाचे झाड.'
जगदीशचंद्र बोस यांनी वृक्षांनाही भावना असतात हे सिद्ध केले होते हे माहित होते परंतू आपल्या माणसाच्या प्रेमाचीे परतफेड वृक्ष आत्महत्या करुन करेल हे अगदीच अनाकलनीय आहे.
या ठिकाणी आमच्या 'लाल्या' ची गोष्ट सांगितल्या शिवाय राहवत नाही. आमच्या भाऊंचे त्याच्यावर खुप प्रेम होते. त्याचं खानं-पिणं, आंघोळ घालणे भाऊच करायचे. भाऊ अपघातात वारल्यानंतर 'लाल्याने' अन्नपाणी सोडले आणि भाऊंच्या दहाव्याच्या दिवशी त्याने प्राण सोडला.
आजच्या पापी, स्वार्थी आणि विश्वासघातकी जगात 'लाल्याला' तो आमचा कुत्रा होता हे म्हणायला सुद्धा मनाला खुप वेदना होत आहेत.
तर मला वाटते त्या नारळाच्या झाडाला 'सोयरे' म्हणणे देखील त्याचा अपमानच आहे. त्याला 'आई' किंवा 'देव' यापेक्षा समर्पक उपमा दूसरी नाही.
आपला हा लेख शाळेतील पुस्तकात 'धडा' म्हणून घालण्याच्या तोडीचा आहे या बद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
आपल्या या लेखाबद्दल आपले त्रिवार धन्यवाद !!!
-रामदास पवार
लेखाचा दुवा (लिंक) खाली देत आहे. सर्वांनी अवश्य वाचावा !
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/maza-adhyatma/vijayraj-bodhankar/tree/articleshow/40862264.cms
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा